Saturday, October 16, 2010

प्रतिभा ' नपुंसक ' झाल्याचा फील !


शीट! बऱ्याच दिवसांत एकही कविता सुचली नाही! संपली आपली प्रतिभा! काय हे! चार ओळी वर्षानुवर्षे सुचत नाहीत म्हणजे काय.. उगाचच कुठली तरी कविता वाचताना आपली बऱ्याच दिवसांपासून पाटी कोरी राहिली असं जाणवलं.. आता असं जाणवल्यावर लगेच सुचायला आपण काय गुरू ठाकूर, संदीप खरे, प्रवीण दवणे थोडेच लागून गेलो. ते इतके भारी आहेत की अशा जाणवण्यावरच एखादी कविता करतील. माझ्यासारख्या कविंना कविता सुचायला हवा असतो एखादा 'टची' विषय.. मनाला भिडणारा.. तळमळवणारा.. संदीप खरे म्हणतो,
'कविचं आयुष्य सोपं असतं यासाठी की,
एक जरी अस्सल कविता लिहिली,
तरी मरायची मुभा असते त्याला..
मात्र, कविचं आयुष्य अवघड असतं यासाठी
की अस काही लिहिल्याची मरेपर्यंत खात्री नसते त्याला॥'
कधी इतकं सहज न येता नुसतेच शब्द टपटपत येतात. ते उतरवत उतरवत कविता आकाराला येते आणि असं बऱ्याच दिवसांतून घडलं नाही की प्रतिभा नपुंसक झाल्याचा फील येतो, जसा की आता आलाय...

No comments:

Post a Comment